ताज्या बातम्या
आजरा साखर कारखान्याची 15 डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा
By nisha patil - 6/1/2026 1:17:24 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025- 26 या हंगामात आजअखेर 62 दिवसात 1,92,000 मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन 2,15,000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि.01.12.2025 ते 15.12.2025 अखेर गाळप झालेल्या 47,099 मे.टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. 3400/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.16 कोटी 1 लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली आहे.
हंगाम 2025- 26 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठरवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळप सुरू असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप सुरळीतपणे सुरू आहे. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणेमार्फत प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या कार्यक्षेत्रातील व कायक्षेत्राबाहेरील ऊसाची उचल केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य.सह.बॅकेचे अध्यक्ष नाम.हसन मुश्रीफ( वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य )यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या संपर्ण ऊसाची व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जात आहेत.
कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्रधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवसथापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आणण्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुभाष देसाई,कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे,विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बॅक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई,संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर,राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील,अशोक तर्डेकर,हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, हाजी रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के.सावंत उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्याची 15 डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा
|