ताज्या बातम्या
आजरा साखर कारखान्याची 30 नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा
By nisha patil - 12/23/2025 2:34:36 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025-26 या गळीत हंगामात आजअखेर 49 दिवसात 1,55,000 मे.टन इतके ऊसाचे गाळप झाले असून कारखान्याकडे दि.16.11.2025 ते 30.11.2025 अखेर गाळप झालेल्या 49,525 मे.टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू.3400/ - प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम रू.16 कोटी 83 लाख ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली.
हंगाम 2025- 26 मध्ये कारखाना व्यवस्थापनाने ठरवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळप सुरू असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून त्यापासुन जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळविणेचा प्रयल करीत आहोत, कारखान्याकडे उपलब्ध असलेल्य बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणेकडून प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या ऊसाची उचल करणेचे काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य.सह.बॅकेचे अध्यक्ष नाम.हसन मुश्रीफ ( वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य )यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत.
कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले असून ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठीकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आणण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस इतर अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुभाष देसाई,कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे,विष्णुपंत केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिरभाऊ देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई., संभाजी पाटील (हात्तीवडे). शिवाजी नांदवडेकर राजेंद्र मुरूकटे,राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नावेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के.सावंत आदिजण उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्याची 30 नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा
|