बातम्या
“एप्रिलचा ‘हवामान बंड’! उन्हाळा गायब, वादळ-पावसाचा कहर सुरूच!”
By Administrator - 4/4/2026 5:53:48 PM
Share This News:
“एप्रिलचा ‘हवामान बंड’! उन्हाळा गायब, वादळ-पावसाचा कहर सुरूच!”
एप्रिल महिना सुरू झाला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढण्याऐवजी पावसानेच हजेरी लावली आहे. देशभर हवामानाचा पूर्ण उलटफेर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात वादळी पाऊस, गारपीट आणि हिमवृष्टी, तर महाराष्ट्रातही गारपिटीचा तडाखा बसला आहे.
भारतीय हवामान विभाग यांच्या इशाऱ्यानुसार ४ ते ७ एप्रिलदरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून मोठ्या नुकसानीचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात इशारा देण्यात आला आहे. शेतातील पिकं धोक्यात असून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
सांगली, सातारा, पुणे भागात पावसाचा इशारा, तर मुंबई-ठाणे परिसरात दमट उकाड्यासह संध्याकाळनंतर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.थोडक्यात… एप्रिलमध्ये उन्हाळा नाही, तर वादळ आणि पावसाचंच राज्य सुरू आहे!
“एप्रिलचा ‘हवामान बंड’! उन्हाळा गायब, वादळ-पावसाचा कहर सुरूच!”
|