स्थानिक नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून प्रशासनाकडे पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली जात आहे. “निधी कागदावरच खर्च झाला की प्रत्यक्ष कामात दिसेल?” असा सवाल नागरिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या वापराबाबत सविस्तर माहिती आणि कामकाजाचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी वाढीस लागली आहे.
सध्या शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था सुरू असल्याने या नव्या निधीचा खरा उपयोग जनहितासाठी होतो की नाही, हे पाहणे आता नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.