विशेष बातम्या
महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल; चौथी-सातवीसाठी नवीन रचना लागू
By nisha patil - 10/18/2025 4:51:37 PM
Share This News:
महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल; चौथी-सातवीसाठी नवीन रचना लागू
महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण बदल मंजूर केला आहे. २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा पूर्वीच्या पाचवी-आठवी ऐवजी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. या बदलामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना लवकरच प्रोत्साहन मिळेल आणि अभ्यासाची आवड वाढेल.
इयत्ता चौथी-सातवीची परीक्षा एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये होईल, तर पाचवी-आठवीची परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये होईल. याशिवाय, पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांची नावे अनुक्रमे 'प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (चौथी स्तर)' आणि 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सातवी स्तर)' असे बदलले जातील.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चौथीसाठी वार्षिक ५,००० रुपये आणि सातवीसाठी ७,५०० रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असून, दोन्ही शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा असेल. १९५४ पासून चालू असलेली ही योजना गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देते तसेच इतरांना प्रेरणा देते.
महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल; चौथी-सातवीसाठी नवीन रचना लागू
|