राजकीय
राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश
By nisha patil - 6/26/2026 11:27:52 AM
Share This News:
कोल्हापूर : समाजसुधारक, लोककल्याणकारी राज्यकर्ते आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्र्यांनी म्हटले की, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण, स्त्रीशिक्षण आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. समता, बंधुता आणि लोककल्याणाच्या मूल्यांवर आधारित त्यांचे कार्य महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श ठरले आहे.
शाहू महाराजांनी सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. त्यांच्या प्रगत विचारांचा वारसा जपत समाजहिताची वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाच्या कार्याला अधिक बळ देण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन पालकमंत्र्यांकडून जयंतीनिमित्त शुभेच्छा
|