राजकीय

कागलचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही.मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Samarjit Singh Ghatge said


By nisha patil - 1/12/2025 11:13:45 AM
Share This News:



कागल, दि. ३०: विकासाच्या पटलावर कागलची वेगळी ओळख निर्माण झालेलीच आहे. समरजीत घाटगे यांच्या सहयोगाने आणि कागलवासियांच्या पाठबळावर कागल शहराला स्वर्ग बनविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक वारसा असलेल्या कागल शहराला सुसंस्कृत घडविण्यासाठी आमची युती योग्यच आहे म्हणूनच युतीला साथ द्या, असे आवाहन समरजीतसिंह घाटगे यांनी केला.
          कागलमध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या विराट जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ व श्री. घाटगे बोलत होते.
            भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राजकारण आणि समाजकारण लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठीच करायचे असते. नगराध्यक्षांसह आमचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांची काळजी घेतील आणि सर्वच लोककल्याणकारी योजना जनतेच्या घरादारापर्यंत अगदी चुलीपर्यंत नेतील.

समरजीतसिंह घाटगे यांच्या बरोबरचा गेल्या दहा-बारा वर्षांचा संघर्ष आता पूर्ण संपलेला आहे. आमचे सर्वच मतभेद गंगार्पण झाले आहेत, असेही ते म्हणाले.
           
चौकट........
आमची कॉलर ताट राहील.....
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि समरजीतसिंह घाटगे यांची युती घडवून आणलेली आहे. कागल नगर परिषदेमध्ये आमच्या आघाडीला इतके प्रचंड बहुमत द्या की श्री. फडणवीस यांच्याकडे भेटायला जाताना आमची कॉलर ताट राहील.
         
शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, सुसंस्कृत कागल घडविण्यासाठी आम्ही  एकत्र आलो आहोत. कागलच्या उज्वल भवितव्यासाठी आमची युती झालीआहे. मुश्रीफ साहेब व आमचे काम आपल्यासमोर आहे.आमचे कामच बोलते. त्यामुळे मुश्रीफ व राजे या कामाच्या ब्रँडच्या मागे रहा. महिलांना लघुउद्योग तर तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक बनविणार तर गांजामुक्त कागल हे आपले ध्येय असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले. प्रा संजय मंडलिक यांना सवाल करताना ते म्हणाले, मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर तुम्ही युती केली कि चांगली व आम्ही केली की ती अभद्र कशी?
           
चौकट.......
नागरिकांना कर सवलत मिळेल....!
कागलमधील प्रस्तावित सोलर सिस्टिमद्वारे ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामुळे खर्चात बचत होईल.सध्या पालिकेचे वीज बिलावर जवळपास एक कोटी रुपये वार्षिक खर्च होतात.हा खर्च वाचणार आहे.
प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन नागरिकांना वीजबलातील होणाऱ्या बचतीमुळे करा मध्ये सवलत  देऊ शकेल.
      
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने म्हणाल्या, माझ्यासह सर्व नगरसेवकांना नेत्यांनी मोठ्या अपेक्षेने उमेदवारी दिली आहे.नागरिक आमच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवतील.त्याला तडा जाऊ न देता समस्त कागलकरांना आभिमान वाटेल असा कारभार करु.
    
जिल्हा बॅकेचे संचालक भैय्या माने, प्रकाश गाडेकर, अखिलेश घाटगे, जयवंत रावण, दीपक मगर, स्वरूपा जकाते, प्रा . मधुकर पाटील, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले .
       
स्वागत राजेंद्र जाधव यांनी केले . प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. यावेळी नविद मुश्रीफ, बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी, रमेश माळी, अशोक जकाते,  सौरभ पाटील, संजय चितारी, दिपक मगर, नवल बोते  यांच्यासह आघाडीच सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . 


कागलचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही.मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास.
Total Views: 14